Wednesday, September 27, 2017

मानसाच्‍या मनाचा मोठेपणा आज कमी होतोय...... गट शिक्षणाधिकारी श्री विठ्ठल भुसारे

देशाचा अन्‍नदाता शेतकरी आज आत्‍महत्‍या करतोय, समाजातील संवेदनशीलता कमी होत आहे.  नातेवाईक, मित्र व शेजा-यांशी संवाद कमी होतोय, एकमेकांच्‍या सुख-दु:खात सहभाग कमी होतोय, मानसाच्‍या मनाचा मोठेपणा आज संपलाय म्‍हणुन आत्‍महत्‍याचे प्रमाण वाढत आहे, असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी श्री विठ्ठल भुसारे यांनी केले़. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयात दिनांक 26 सप्‍टेबर रोजी व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगीत ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ डि एन गोखले हे होते तर व्‍यासपीठावर सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर, विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे, डॉ. टि बी तांबे, डॉ सय्यद ईस्‍माईल, डॉ आर पी कदम आदींची उपस्थिती होती. 
श्री विठ्ठल भुसारे पुढे म्‍हणाले की, जे विद्यार्थ्‍यी उत्‍साहात आत्‍मज्ञानानी शिकले ते जिंकले, जे नाही शिकले ते हुकले. विद्यार्थ्‍यांनी व्‍यसनापासुन दुर राहण्‍याचा सल्‍लाही त्‍यांनी दिला. कार्यक्रमाचा अ‍ध्‍यक्षीय समारोप प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केला. यावेळी विद्यार्थ्‍यां आपला सांस्‍कृतिक कलागुणांचे सादरीकरण केले. महाविद्यालयातील पदवी व पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमात तसेच क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्‍य मिळविलेल्‍या विद्यार्थ्‍यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्रा रणजित चव्‍हाण यांनी केले. सुत्रसंचालन गणेश कापावर व दिपाली जाधव यांनी केले़ तर आभार सौरभ मोकाशे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येन उपस्थित होते.