Saturday, July 1, 2017

पर्यावरण संतुलनासाठी एक विद्यार्थ्‍यी एक वृक्ष ही संकल्‍पना रूजवणे गरजेचे.....कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वृक्ष दिंडी व वृक्ष लागवड महोत्‍सवाचे उद्घाटन


महाराष्‍ट्रात सर्वात कमी वनराई ही मराठवाडयात आहे, केवळ वृक्ष लागवड करून उपयोगाचे नसुन वृक्ष संवर्धनाचा संकल्‍प करणे आवश्‍यक आहे. पर्यावरण संतुलनासाठी माननीय पंतप्रधानाची संकल्‍पना एक विद्यार्थ्‍यी एक वृक्ष ही रूजवणे गरजेचे असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व सामाजिक वनीकरण विभाग परभणी (महाराष्‍ट्र शासन) यांच्‍या संयुक्त विद्यमाने भव्‍य वृक्ष दिंडी व वृक्ष लागवड महोत्‍सवाचे उदघाटन कृषि महाविद्यालयाच्‍या प्रांगणात दिनांक 1 जुलै रोजी करण्‍यात आले. महाराष्‍ट्र शासनाने यावर्षी राज्‍यात चार कोटी वृक्ष लागवड मोहिम हाती घेतली असुन या मोहिमेचे उद्घाटन करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा मा. श्रीमती उज्‍वलाताई राठोड या होत्‍या तर उद्घाटक कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु व विशेष अतिथी म्‍हणुन जिल्‍हाधिकारी मा. श्री पी शिवा शंकर हे उपस्थित होते. व्‍यासपीठावर मुख्‍य कार्यकारी अधिकारी मा. श्री. सुशिल खोडवेकर, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, उपजिल्‍हाधिकारी श्री सुदर्शन गायकवाड, तक्रार निवारण अधिकारी डॉ आखिल शेख, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, विभागीय वनाधिकारी श्री प्रेमानंद डोंगरे, विभागीय वनाधिकारी श्री सुरेश केवटे, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, वृक्ष लागवड करतांना लिंब झाडाची लागवड केल्‍यास याचा पर्यावरणाच्‍या दृष्‍टीने जास्‍त उपयोग होईल. एक विद्यार्थ्‍यी एक वृक्ष ही माननीय पंतप्रधानाची संकल्‍पना महाविद्यालयांनी राबवावी, महाविद्यालयातील शिक्षण पुर्ण झाल्‍यानंतर विद्यार्थ्‍यांनी लावलेले झाडाचे संवर्धन झाले असल्‍याच त्‍यांना पदवी प्रदान करावी, अशी यंत्रणा निर्माण करावी. परभणी कृषि महाविद्यालय राबवित असलेली ही संकल्‍पना निश्चितच कौतुकास्‍पद आहे
जिल्‍हाधिकारी मा. श्री. पी. शिवा शंकर आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, राज्‍याने चार कोटी वृक्ष लागवडीचा संकल्‍प केला असुन परभणी जिल्‍हयाचे सव्‍वासात लाख वृक्ष लागवडीचे उदिदष्‍ट आहे. परभणी जिल्‍हयातील ग्रीन कव्‍हर वाढविण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांना व युवकांना पुढाकार घ्‍यावा लागेल. आपले घर, शेती, शाळा, महाविद्यालय आदी परीसरात वृक्ष लागवड करून त्‍यांचे संवर्धन करण्‍याची जबाबदारी घ्‍यावी.
अध्‍यक्षीय समारोपात जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा मा. श्रीमती उज्‍वलाताई राठोड यांनी पाणी टंचाई वर मात करण्‍यासाठी समाजातील प्रत्‍येक घटकांनी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन मोहिमेत योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन केले. शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, कृषि विद्यापीठाचा परिसर हिरवळीने नटलेला असुन शहरातील नागरिकांच्‍या आरोग्‍यादृष्‍टीने निश्चितच लाभदायी आहे

यावेळी वृक्ष दिंडीस हिरवा झेंडा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते दाखवुन प्रारंभ करण्‍यात  आला तसेच मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ परिसरात वृक्ष लागवड करण्‍यात आलीकार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी महाविद्यालयातील प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांनी वृक्ष लागवड करून वृक्ष संगोपनाची जबाबदारी घेतली असल्‍याचे सांगितले. सुत्रसंचालन डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले तर आभार श्री सुरेश केवटे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य प्रा. विशाला पटणम, प्राचार्य डॉ अशोक कडाळे, प्राचार्य डॉ अरविंद सावते, प्राचार्य डॉ अरूण कदम, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख, राष्‍ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रमाधिकारी व राष्‍ट्रीय छात्र सेनेचे छात्राधिकारी यांच्‍या पुढाकाराने अधिकारी, कर्मचारी व स्‍वयंसेवकांनी परिश्रम घेतलेकार्यक्रमास जिल्‍हा प्रशासन, सामाजिक वनीकरण विभागातील व विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.