Monday, August 22, 2016

आजही समाजास बुरसटलेल्‍या विचारातुन स्‍वातंत्र्य पाहीजे......प्रभारी कुलगुरू तथा शिक्षण संचालक मा. डॉ. अशोक ढवण

तिरंगा मार्चला वनामकृविच्‍या विद्यार्थ्‍याचा मोठया प्रतिसाद
तिरंगा मार्चला हिरवा झेंडा दाखवितांना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण, प्राचार्य डि एन गोखले, प्राचार्य डॉ व्हि डि पाटील आदी. 
तिरंगा मार्च रॅलीस संबोधित करतांना स्‍वातंत्र सेनानी मा. श्री. वसंतराव अभुंरे, व्‍यासपीठावर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण, प्राचार्य डि एन गोखले, प्राचार्य डॉ पी एन सत्‍वधर, प्राचार्य प्रा. विशाला पटणम, प्राचार्य डॉ कदम, प्राचार्य डॉ उदय खोडके, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदी. 
तिरंगा मार्च रॅलीस संबोधित करतांना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण व्‍यासपीठावर स्‍वातंत्र सेनानी मा. श्री. वसंतराव अभुंंरे, प्राचार्य डि एन गोखले, प्राचार्य डॉ पी एन सत्‍वधर, प्राचार्य प्रा. विशाला पटणम, प्राचार्य डॉ ए एस कदम, प्राचार्य डॉ उदय खोडके, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदी.
देशास स्‍वातंत्र्य प्राप्‍त होऊन ७० वर्ष पुर्ण झाले, देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली. आजही स्‍त्री–भ्रुण हत्‍या, अंधश्रध्‍दा, कुपोषण, देश विघातक शक्‍ती आदी समस्‍यांनी ग्रासला आहे. समाज अनेक बुरसटलेल्‍या विचारांनी जखडला असुन समाजास या बुरसटलेल्‍या विचारापासुन स्‍वातंत्र्य पाहिजे, यासाठी तरूणांनी समाजात जागृत राहुन लढा दिला पाहिजे, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू तथा शिक्षण संचालक मा. डॉ. अशोक ढवण यांनी व्‍यक्‍त केले. विद्यापीठाच्‍या कल्‍याण अधिकारी कार्यलयाच्‍या वतीने राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या माध्‍यमातुन दिनांक २२ ऑगस्‍ट रोजी तिरंगा मार्चचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी रॅलीस संबोधित करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास स्‍वातंत्र्य सेनानी मा. श्री. वसंतराव अंभुरे हे प्रमुख पाहुणे म्‍हणुन उपस्थित होते तर प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, प्राचार्य डॉ. उद्य खोडके, प्राचार्य डॉ. विलास पाटील, प्राचार्य प्रा. विशाला पटणम, प्राचार्य डॉ. पी. एन. सत्‍वधर, प्राचार्य डॉ. ए. एस. कदम, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रभारी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, अनेक क्षेत्रात महिला देशाचे नाव उज्‍वल करीत आहेत. महिला सक्षम करण्‍यासाठी आरक्षण देण्‍यात आले, परंतु महिलांना खरी गरज आहे ती स्‍त्री सरंक्षणासाठी स्‍त्री-भ्रुण आरक्षणाची. आज देशात अनेक देश विघातक शक्‍ती कार्य करित असुन त्‍यापासुन देशास वाचविण्‍यासाठी तरूणांना पुढाकार घ्‍यावा लागेल, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. स्‍वातंत्र्य सेनानी मा. श्री. वसंतराव अंभुरे यांनी आपल्‍या भाषणात विद्यापीठाचे कार्याची प्रसंशा करून तिरंगा मार्चाच्‍या यशस्‍वी आयोजनाबाबत अभिनंदन केले.
प्राचार्य प्रा. विशाला पटणम यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमात स्‍वातंत्र्य सेनानी मा. श्री. वसंतराव अंभुरे यांचा विद्यापीठाच्‍या वतीने प्रभारी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. पी. एच. गौरखेडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. निता गायकवाड यांनी केले. रॅली दरम्‍यान विद्यार्थ्यांनी तिरंगा फडकवित देशभक्‍तीपर घोषणा दिल्‍या. तिरंगा मार्च रॅली विद्यापीठातील कृषी महाविद्यालय, अन्‍न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, गृहविज्ञान महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय आदींच्‍या विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया उत्‍साहाने सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी क्रीडा अधिकारी डॉ आशा शेळके, प्रा. शाहु चव्‍हाण, प्रा. डि एफ राठोड, डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्रा आर टि रामटेके, प्रा विजय जाधव, डॉ. जे डी देशमुख, प्रा संजय पवार, प्रा एस पी सोंळुके, प्रा प्रविण घाटगे, प्रा. रविंद्र शिंदे, श्री. किशोर शिंदे आदींचे सहकार्य लाभले.