Tuesday, February 9, 2016

शेतक-यांनी विद्यापीठाचे कमी खर्चाचे कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करावा ....... विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले

मौजे धारासुर येथे शेतकरी मेळावा संपन्‍न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व तालुका कृषि अधिकारी, गंगाखेड यांच्‍या संयुक्‍त विदयमाने धारासुर ता. गंगाखेड येथे राष्‍ट्रीय कृषि विकास योजना एकात्मिक तंत्रज्ञान प्रसार प्रकल्‍पांतगर्त शेतकरी मेळावा व "उमेद" कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 6 फेब्रुवारी रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन विदयापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तर कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सरपंच श्रीमती अनिताताई शिंदे या होत्‍या.
उद्घाटनपर भाषणांत बोलतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी बी भोसले म्‍हणाले की, शेतक-यांनी खचून न जाता परिस्थितीशी सामना करावा, शासन व कृषी विदयापीठ आपल्‍या पाठीशी आहे. शेतक-यांनी विद्यापीठाचे कमी खर्चाचे कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्‍याची  शिफारस त्‍यांनी केली.
यावेळी डॉ. यु. एन. आळसे यांनी टंचाई परिस्थितीत पीक व्‍यवस्‍थापन विषयावर तर प्रा. डी. डी. पटाईत यांनी हुमणी व्‍यवस्‍थापनावर पॉवर पांईट व्‍दारे मार्गदर्शन केले. डॉ. अे. टी. शिंदे यांनी चारा व्‍यवस्‍थापनावर मार्गदर्शन केले. कृषि विकास अधिकारी श्री. बी. एस. कच्‍छवे  यांनी जिल्‍हा परिषदेच्‍या कृषी विभागामार्फत देण्‍यास येणा-या विविध योजनांबदल महिती दिली. जिल्‍हा परिषद सदस्‍या सौ. हर्षलाताई कदम यांनी सोयाबीन, कडधान्‍य व इतर धान्‍यांचा आहारात वापर करुन सकस आहार कमी खर्चाने कस करता येईल याबदल विद्यापीठ तज्ञांनी मार्गदर्शन करण्‍याची अपेक्षा व्‍यक्‍त केली. बालरोग तज्ञ डॉ.एम.टी.जाधव यांनी शेतकरी आत्‍महत्‍या का होतात? याचे विश्‍लेषण करून शासनाच्‍या शेतक-यांसाठी आरोग्‍यविषयक विविध योजना सांगितल्‍या.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्‍तार कृषिविदयावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळ कृषि अधिकारी श्री. नांदे यांनी केले व सुत्रसंचलन श्री. उदय वाईकर यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी तालुका कृषि अधिकारी श्री. जी. अे. कोरेवाड, एस. बी. जाधव, अशोक पंडित तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक दगडुदादा जाधव, अच्‍युतराव जाधव, उपसरपंच मधुकर कदम, अनंतराव कदम, अर्जुन जाधव, प्रल्‍हादराव जाधव, दिगंबरराव जाधव, प्रतापराव कदम, अतुलदादा जाधव, दत्‍तात्रय जाधव, सदानंद जाधव, अशोक जाधव, एकनाथराव कदम, नरेंद्र जाधव, रामराव जाधव यांनी परिश्रम घेतले.