Saturday, October 17, 2015

जीवनात यशस्‍वी होण्‍यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही .......कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

कृषि महाविद्यालयातील नुतन प्र‍वेशित पद्व्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांचा उद्बोधन कार्यक्रम संपन्‍न


महाविद्यालयीन जीवनातच व्‍यक्‍तीमत्‍व विकास होत असतो, याच काळात विद्यार्थ्‍यांनी संवाद कौशल्‍य विकसित केले पाहिजे. जीवनात यशस्‍वी होण्‍यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने पद्व्‍युत्‍तर पदवी अभ्‍यासक्रमास नुतन प्रवेशित विद्यार्थ्‍यांचा स्‍वागत समारंभ व उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन दि १७ ऑक्‍टोबर रोजी करण्‍यात आले होते, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्‍हणुन विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा डॉ पी आर शिवपुजे, मा श्री रविंद्र देशमुख व मा श्री अनंतराव चोंडे हे उपस्थित होते तर प्राचार्य डॉ डि एन गोखले, जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ विलास पाटील, डॉ डि बी देवसरकर, प्रा एन जी लाड आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, कृषि क्षेत्रापुढे विशेषत: मराठवाडयातील कोरडवाहु शेतीपुढे अनेक आव्‍हाने असुन यावर आधारित संशोधनावर कृषि पद्व्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांनी भर दयावा. विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा डॉ पी आर शिवपुजे यांनी व्‍यक्‍तीचा दृष्टिकोनच अनेक समस्‍याचे समाधान करू शकतो व आंतर विद्याशाखा संशोधन होणे गरजेच असल्‍याचे सांगितले. तसेच विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री रविंद्र देशमुख यांनी विद्यार्थ्‍यांनी स्‍वत:च्‍या शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठी करावा, असा सल्‍ला दिला तर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री अनंतराव चोंडे यांनी कृषि पदवीधरांनी संशोधनातुन भविष्‍य घडवावे असे सांगितले. कार्यक्रमात प्रा एन जी लाड यांनी महाविद्यालयाच्‍या शैक्षणिक नियमावलीबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयात नुतन प्रवेशित विद्यार्थ्‍यीनी मनोगत व्‍यक्‍त केले तर नुतन प्रवेशित विद्यार्थ्‍यांचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पुष्‍पगुच्छ देऊन स्‍वागत करण्‍यात आले.
कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी महाविद्यालयाच्‍या शै‍क्षणिक कार्याची माहिती देऊन महाविद्यालयाने देशास व राज्‍यास अनेक शास्त्रज्ञ, प्राध्‍यापक व अधिकारी दिले असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ ए एस कार्ले यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 
मार्गदर्शन करतांना विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा डॉ पी आर शिवपुजे
मार्गदर्शन करतांना विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री अनंतराव चोंडे
मार्गदर्शन करतांना विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री रविंद्र देशमुख