Friday, May 22, 2015

परिश्रमास प्रयत्नांची जोड दिल्यास यश मिळणे कठीण नाही.........प्राचार्य डॉ. उदय खोडके

 

परिश्रमास प्रयत्नांची जोड दिल्यास यश मिळणे कठीण नाही, महाविद्यालयातून प्राप्त ज्ञान आणि कौशल्यांचा राष्ट्र उन्नतीसाठी विद्यार्थ्‍यांनी वापर करावा, असे आवाहन सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील कृषी अभियांत्रिकीच्‍या पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या दिनांक २१ मे रोजी आयोजित निरोप समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर डॉ स्मिता खोडके, प्रा व्ही एम भोसले, प्रा एच डब्लू आवारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ. उदय खोडके पुढे म्‍हणाले की, शेतीत यांत्रिकीकरणाची मोठी गरज असुन शेतक-यांना याबाबत चांगली सेवा देण्‍याची मोठी संधी कृषी अभियांत्रिकीच्‍या पदवीधरांना आहे. कृषी अभियांत्रिकीच्‍या पदवीधरांनी शेतक-यांसाठी कार्य करावा, असा सल्‍ला ही त्‍यांनी दिला. कार्यक्रमात प्रा गोपाळ शिंदे यांनी नोकरीच्या संधी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी रघुनाथ जगतापधनराज जाधवअभयसिंह पवारअनंता हांडेविवेक महाजन, पंढरी मस्के या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा मधुकर मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी राजेंद्र पवार आणि गोविंद फुलारी यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुछ देवून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रा.पंडित मुंडे, प्रा.दयानंद  टेकाळेप्रा.सुमंत जाधवप्रा.सुहास जाधवप्रा.प्रमोदिनी मोरेप्रा.रविंद्र शिंदेप्रा.लक्ष्‍मीकांत राऊतमारेप्रा.मधुकर मोरेविद्यार्थी प्रतिनिधी नवनाथ घोडके आदींसह प्राध्‍यापक व अधिकारीविद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पांचाळकच्छवेगिरीखिल्लारेकटारेशेळके आणि रणेर आदींनी परिश्रम घेतले.