Friday, February 14, 2014

धर्मापुरी येथे आळंबी उत्‍पादनावर मार्गदर्शन


     वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या अ‍‍खिल भारतीय समन्‍वयीत संशोधन प्रकल्‍प मानव विकास व कौटुंबिक अभ्‍यास आणि कृषि महाविद्यालय, परभणी च्‍या आळंबी उत्‍पादन अनुभवाधारीत प्रशिक्षण कार्यक्रम यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने धर्मापुरी येथे ग्रामीण युवकांसाठी एक दिवशीय आळंबी प्रक्रिया व उत्‍पादन या विषयावर प्रशिक्षण दि. 12 फेब्रुवारी रोजी देण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी तंटामुक्‍तीचे अध्‍यक्ष राजकर्ण कदम होते तर सरपंच नारायण रेंगे व पोलीस पाटील शेषराव कदम उपस्थिती होती. प्रा डॉ. कल्‍याण आपेट यांनी आळंबी तयार करण्‍यासाठी लागणारे बेड, स्‍पॉन, त्‍याचे बी उत्‍पादन या विषयी मार्गदर्शन केले तर वरिष्‍ठ संशोधिका प्रा. निता गायकवाड यांनी जिल्‍हा उद्योग केंद्राचे महाराष्‍ट्र स्‍पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्‍प व आत्‍मा या विषयी सविस्‍तर माहिती दिली. ग्रामीण युवकांनी आळंबी उत्‍पादन सारख्‍या जोड व्‍यवसाय करण्‍याचे आवाहण केले. कृषि महाविद्यालयातील आळंबी उत्‍पादन अनुभवाधारीत प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या विद्यार्थ्‍यांनी आळंबी तयार करण्‍याचे प्रात्‍यक्षीक दाखवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहयोगी संशोधन रेश्‍मा शेख यांनी केले. कार्यक्रमास गावातील युवक, शेतकरी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.